औरंगाबाद : मराठवाडा विभागावर सातत्याने अन्याय होत आलेला आहे आजही मराठवाड्याचा विकासाचा अनुशेष तसाच कायम आहे. देशांमधील अनेक राष्ट्रीयकृत बँकांचे केंद्र सरकारने विलीनीकरण केले आहे. बँकांच्या या विलिनीकरणाच्या धोरणामुळे मराठवाड्यात बँकांच्या शाखांची संख्या कमी झालेली आहे,याचा थेट परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होत असून शेतकरी ग्रामीण जनता अनेक लाभांपासून वंचित राहत आहे. उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेने मराठवाडा याही बाबतीत मागे असून मराठवाड्यात साधारण नऊ हजार 676 लोकसंख्येमागे बँक आहे हे प्रमाण पश्चिम महाराष्ट्र,विदर्भ, कोकण, विदर्भ या भागांच्या तुलनेने कमीच आहे, त्यामुळे कर्ज वितरणात देखील मराठवाडा मागेच राहत आहे ज्या बँका आहेत त्यातही पायाभूत सुविधांची बोंबाबोंब आहे,

इंटरनेट बंद ,कुठे कर्मचारी कमी यामुळे बँकेत ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात म्हणूनच आज केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मराठवाड्याचे भूमिपुत्र डॉ. भागवत जी कराड यांची अखिल भारतीय क्रांतिसेनेचे सरचिटणीस नितीन देशमुख यांच्या नेतृत्वखाली शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांना मराठवाड्यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखांची संख्या वाढवावी व नागरिकांची होत असलेले हाल थांबवावे,अशी मागणी अखिल भारतीय क्रांतिसेनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली. वाळूज महानगर येथे मंत्री महोदय आले असता भेट घेऊन त्याना निवेदन सादर करण्यात आले .यावेळी अखिल भारतीय क्रांतिसेनेचे वाळूज महानगर प्रमुख दिनेश दुधाट, ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय कोकाटे, मराठवाडा संघटक विलास अंभोरे, वाळूज महानगर युवा अध्यक्ष औदुंबर देवडकर, जिल्हा संघटक राजू शेरे ,वाळूज महानगर उपाध्यक्ष दीपक गायकवाड,वाळूज महानगर युवा सचिव गजानन खाडे,वाळूज महानगर युवा संघटक अमोल साळुंके,विक्रम आळंजकर,गणेश अंभोरे पाटील ,अक्षय गाडेकर, राहुल मार्कंडे, राहुल काळे,शरद कदम, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते .

प्रतिनिधी:- अनिकेत घोडके
NTV न्युज मराठी, वाळुज औरंगाबाद- 8484818400

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *