उस्मानाबाद : जनता विद्यालय, येडशी येथे उन्हाळी सुट्टीतही शाळा अखंड सुरू ठेवणे व पुढील शैक्षणिक वर्षाचे (2022-23) नियोजन यासाठी शिक्षक-पालक मेळाव्याचे आयोजन उत्साहात करण्यात आले. कार्यक्रमाच्या *अध्यक्षस्थानी प्राचार्य आर. डी.गाढवे सर, प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक श्री पांगरे सर,येडशी चे माजी उपसरपंच श्री सुधीर सस्ते व पालक श्री उल्हास कंकाळ विचारपीठावर हजर होते.
कोरोनाकाळामध्यें विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरुन काढण्यासाठी ‘श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी ‘ या मातृ संस्थेने उन्हाळी सुट्टीतही शाळा अखंड सुरू ठेवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याबद्दल ची पालकांची मते जाणून घेणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. दोरकर सर यांनी केली. जनता विद्यालय ही शाळा संस्थेच्या ‘डिजीटल स्कूल’ या उपक्रमांतर्गत सध्या विकसीत करण्याचे काम संस्थेकडून सुरु होणार आहे. सध्या माध्यमिक विभागातील 20 पैकी 11 वर्गाखोल्यांमध्ये स्मार्ट बोर्ड व स्मार्ट प्रोजेक्टर सेट अप तयार झाला असून विद्यार्थ्यांना याद्वारे डिजिटल शिक्षण देणे सुरू झाले आहे. या विषयीची सविस्तर माहिती श्री बालाजी करंजकर सर यांनी दिली व ‘डिजीटल शाळा’चे प्रात्यक्षिक दिले.शाळेमधल्या *नावीन्यपूर्ण उपक्रमाविषयी प्राचार्य आर. डी.गाढवे सर यांनी माहीती दिली.यावेळी माता पालकांची उपस्थिती लक्षणीय होती.याप्रसंगी अनेक पालकांनी आपल्या सूचना मांडल्या तसेच शाळेच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केले. या मेळाव्यास मोठय़ा संख्येने इतर पालक तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री उपळकर वाय.एस.यांनी केले तर आभारप्रदर्शन श्री बालाजी करंजकर सर यांनी केले.
प्रतिनिधी रफिक पटेल
येडशी उस्मानाबाद
मो.9922764189