प्रतिनिधी नळदुर्ग
सध्या महाराष्ट्र भर भोंग्यावरून वादळ निर्माण होत असताना मुस्लिम धर्म गुरू हाफीज सय्यद सगीर अहेमद जाहगीरदार यांनी नळदुर्ग येथील जामा मस्जिद येथे गुरू वार दि .05 रोजी मार्गदर्शन करताना भोंग्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा जो आदेश आहे . त्यानुसार अजान देण्याचे आवाहन कलेल होते . शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले होते . त्यानुसार नळदुर्ग शहरातील पत्रकारांनी धर्मगुरूच्या बातमीस प्रसिध्द झाली . मात्र काही राजकीय नेत्यांना धार्मिक तेढ निर्माण करण्याकरिता पत्रकारांचा सोशल मिडीयाच्या माध्यमातून तीव्र निषेध करून धार्मिक गुरूंना राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला . सोशल मिडीयामध्ये अनेक व्हॉट्स अॅप ग्रुप मध्ये मजकूर टाकून दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे . सदर धर्म गुरूंनी केलेल्या वक्तव्याचा व मनसेच्या नेत्यांचा पोलीस प्रशासनाने स्वागत केले आहे .

परंतू मनामध्ये द्वेष भावना ठेवून शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण करण्याकरिता सोशल मिडीयाचा वापर करीत आहे . यापूर्वीही दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून झाला आहे अशा व्यक्तीवर त्वरीत गुन्हे दाखल करण्यात यावे

अशी मागणी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली यावेळी उपस्थित शिवसेना नेते कमलाकर चव्हाण पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे उपाध्यक्ष आयुब शेख सचिव सुनील गव्हाणे कोषाध्यक्ष भगवंत सुरवसे प्रसिद्धीप्रमुख शिवाजी नाईक ज्येष्ठ पत्रकार विलास येडगे, तानाजी जाधव ,अजित चव्हाण, शोहेब काजी, उपस्थित होते या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक सुधीर मोठे यांच्याकडे देण्यात आला