जन्मतः आपल्या दोन्ही हाताचे पंजे नसलेल्या गायत्रीला राज्यमंत्री बच्चू भाऊनी केले असं काही की…
(सचिन बिद्री दि 22 जुलै 2021)
गोरगरीब आणि दिव्यांगांसाठी मदतीचा हात पुढे करीत त्यांच्यासाठी झटणाऱ्या राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एका दिव्यांग मुलीला मदतीचे बळ
दिले आणि या बळावर ती दिव्यांग मुलगी आता स्वावलंबी बनली आहे. स्वावलंबी बनलेल्या दिव्यांग मुलीचे नाव गायत्री चंद्रशेखर निहाटकर असे असून ती जन्मतःच दोन्ही हाताचे पंजे नसलेली,अत्यंत गरीब कुटुंबातील आहे.अकोला जिल्ह्यातील १००% दिव्यांग गायत्री च्या जीवनात केवळ निराशाच होती तर भविष्य अंधारात होते पण गायत्री मध्ये होते खंबीर आत्मविश्वास…!

100 टक्के अपंग असून देखील जगण्याची व काहीतरी करून दाखविण्याची उमेद मनात होती, त्या धडपडीतूनच गायत्रीने पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले.आणि आता एम ए च्या फायनल इयर मध्ये शिकत आहे. परंतु उर्वरित आयुष्य सन्मानाने व स्वावलंबी होऊन जगता यावे, यासाठी गायत्रीचा संघर्ष सुरू होता, त्यासाठी तिने अनेकदा शासनाकडे नोकरी साठी साकडे घातले, परंतू यश आले नाही, त्यामुळे ती खचून गेली होती. अत्यंत हलाखीचे जिणे जगत असताना, मदत करणे तर दूरच, परंतु साधी विचारपूस करायला देखील, धर्माचे ठेकेदार म्हणून घेणारे कुठलेही महाभाग पुढे आले नाहीत.

गायत्री ची कहाणी मा ना बच्चूभाऊ कडू यांना सोशल मीडिया च्या माध्यमातून कळली. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी तिला तात्काळ स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदतीचे आश्वासन दिले.
ना बच्चूभाऊ यांनी कु.गायत्रीला, आपल्या अधिकारांचा वापर करून, ती रहात असलेल्या, कुटासा, ता अकोट, ह्या गावात तिला “सेतू” (सामूहिक सुविधा केंद्र ) मंजूर करून दिले. त्यासाठी लागणारे, संगणक, प्रिंटर, इंटरनेट इत्यादी व्यवस्था स्वतः करून दिली.परिणामी आज कु. गायत्रीने स्वतःचे शासनमान्य सेतू केंद्र सुरू करून, सन्मानाचे व स्वावलंबी जीवन सुरू केले आहे .
एन टी न्युज मराठीशी बोलताना गायत्री आणि तिच्या कुटुंबियांच्या शब्दा शब्दातून मा. बच्चूभाऊ यांच्याविषयीचे प्रेम, आपुलकी व कृतज्ञता व्यक्त होत होती. आज अश्या कितीतरी गायत्री व दिव्यांग व्यक्ती यांचे जीवनात, मा बच्चूभाऊ यांनी आनंद फुलविला आहे, म्हणूनच तर बच्चूभाऊ यांना दिव्यांगांचे दैवत म्हणतात.
BacchuKadu #Prahar #Gayatri #बच्चूकडू