अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त शेतकरी, व्यापाऱ्यांना मदत करा
उमरखेड : पूरग्रस्त शेतकरी, व्यापाऱ्यांचे नुकसान भरपाई साठी उमरखेड नगरपालिका निधी अंतर्गत मुख्यमंत्री सहायता निधी करिता पाच लक्ष रुपये देण्यात यावे अशी मागणी राजू भैय्या जयस्वाल यांनी नगर परिषदेचे अध्यक्ष व मुख्याधिकार्यांकडे केली आहे.
सध्या महाराष्ट्रात अतिवृष्टी व पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा फटका मोठ्या प्रमाणात शेतकरी व व्यापाऱ्यांना बसला आहे. कोरोनामुळे आधीच सर्वसामान्यांची आर्थिक बाजू डबघाईस आली आहे. वरून या अतिवृष्टीमुळे सर्वसामान्यांच्या आशेवर निराशा पाडण्याचे काम केले आहे. सध्या महाराष्ट्र बिकट परिस्थितीतून जात असून आर्थिक टंचाई जाणवत आहे. राज्य शासनातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधी ला मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून, सामाजिक जाणीव म्हणून उमरखेड नगरपालिकेने सुद्धा आपल्या निधीअंतर्गत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाच लक्ष रुपये देऊन सामाजिक दायित्व जपावे अशा आशयाचे निवेदन नगरसेवक राजू भैय्या जयस्वाल यांनी नगरपालिकेला दिले आहे.