• आज कांजूरमार्ग येथे आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. कारण ही किड होती ती गेली.
  • आरोप कोणावर होतात, जे लोक मोठे असतात त्यांच्यावर होतात.
  • तिचे कोणाशीच पटत नव्हते मी समजून घ्यायचो.
  • ती गेल्याने आम्हाला काही फरक पडत नाही. शिवसेना उध्दव ठाकरे गटाचा नगरसेवक इथे मोठ्ठ्या फरकाने निवडून येईल अशी मला खात्री आहे.
  • ते हॉस्पिटल स्नेहल आंबेकर महापौर असताना वात्सल्य ट्रस्टला देण्याचे ठरले होते. मी आमदार झाल्यावर ते रद्द केले.
  • जय राऊत यांच्याकडे तक्रार केली असेल तर त्यांनी दाखवून द्यावे.
  • ती कशाला गेली हे मला माहीत आहे, आर्थिक बाब आहे, माझ्याकडे पुरावे आहेत, त्याशिवाय ती जाणार नाही.
  • काल धिंड काढली, आधी वर्षावर घेऊन गेले मग ठाण्यात घेऊन आले.
  • श्रीकांत शिंदे येऊ दे ,एकनाथ शिंदे येऊ दे, या कांजूर भांडुप मध्ये कोणी येऊ दे, इथे आमचाच माणूस निवडून येईल.
  • माझ्या मतदार संघात मी कामे केली आहेत.
  • आरोप करायला कोणी तरी हवे म्हणून माझ्यावर आरोप केले आहेत.
  • शिवसेनेत संजय राऊत मोठे नेते आहेत, ते जी भांडाफोड करत आहेत. त्यामुळे धमकी येत आहेत, आता आम्हाला हे कॉमन झाले आहे. आम्ही धमकीला घाबरत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *