गडचिरोली : गेल्या अठरा महिन्यापासून कोरोना महामारीने थैमान घातल्यामुळे अख्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे , दिवसेंदिवस मृत्युच्याही प्रमाणात वाढ होत आहे . कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन त्यापासून होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासन स्तरावर विविध उपाययोजना सुरू आहेत , प्रत्येक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी कोविड लस उपलब्ध करण्यात आली असून , कोरोना पासून मुक्ती मिळविण्यासाठी प्रत्येकांनी लसीकरण करून घ्यावे असे आव्हान आष्टी ईलूर जिल्हा परिषद क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्य सौ रूपालीताई पंदीलवार यांनी केले
पत्रकार श्री भास्कर फरकडे यांनी आपल्याकडून कोविड जनजागृती कशाप्रकारे होत आहे असे विचारणा केली असता सांगितले
पुढे म्हणाले की देशात गेल्या अठरा महिन्यापासून कोरोना महामारी सुरू आहे , कोरोनाचा तीव्र प्रभाव लक्षात घेऊन त्यापासून होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संचार बंदी करून लॉकडाऊन करण्यात आले संपूर्ण देशात राज्यासह जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या मात्र कोरोना पूर्णतः संपुष्टात आला नाही , सध्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे . कोरोनवर मात करण्यासाठी कोविड लस तयार करण्यात आली असून , तिसऱ्या लाटेपासून सावधगिरी बाळगण्यासाठी आणि कोरोना पासून कायमची मुक्ती मिळण्यासाठी प्रत्येकांनी लसीकरण करावे असे आव्हान केले आष्टी ईलूर क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य सौ रूपालीताई पंदीलवार यांनी चर्चेदरम्यान माहिती दिली
