भारतीय जनता पार्टीच्या २ नगराध्यक्षांसह ८ जणांचा आटकपुर्व जामीन अर्ज सर्वोच्य न्यायालयाने फेटाळला आहे
प्रतिनिधी (आयुब शेख )

उस्मानाबाद : ही राजकिय दबावाखाली अद्याप आरोपींना अटक कण्यास पोलीस धजावत नसल्याने आरोपी फरार दर्शवले जात आसुन नुतन जिल्हा पोलीस अधिक्षक निवा जैन आतातरी आरोपींना पकडतील का?असा संतप्त सवाल जिल्ह्यातील नागरीक विचारीत आहेत
नळदुर्ग शहरात सन 2005मध्ये 1206घरकुल बांधावयाची योजना I h s d p मंजुर झाली होती या करीता शासनाचे विसकोटी रुपये मंजूर झाले होते.या योजनेत शहरातिल दारिद्रय रेषे खालिल नागरीकांनी आपला विसटक्के लोकवाटा भरुन या योजनेत सहभाग घेतला होता व हे सर्व घरे तिनवर्षाच्या आत बांधुन नागरीकांना सुपूर्द करायची होते.परंतु या योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाल्याने सदर योजनाच रखडली.1206घरापैकी केवळ 300 घरे बांधुन आलेला निधी संगणमताने हडप्प करण्यात आला. या मुळे नळदुर्ग शहरातिलअनेक नागरीकांनी मोर्चे आंदोलनेही केली परंतु ढिम्म प्रशासन राजकीय वरदहस्त असल्याने भ्रष्टाचार्याना पाठीशी घालीत होते.यामुळे राष्ट्र वादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य अशोकभाऊ जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातिल सामाजिक कार्यकर्ते अमृत पुदाले यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करुन दोशीवर फौजदारी कारवाई करुन शासकिय निधी व्याजासह वसुल करावा व लाभार्थांना घरकुल उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी केली होती. सदर प्रकरणी औरंगाबाद उच्य न्यायालयात सुनावणी वेळी माननिय न्यायालयाने औरंगाबाद विभागीय आयुक्तांना सदर प्रकरणी अहवाल सादर करण्यास सांगितले होते.त्या नुसार विभागीय आयुक्तांनी तांञीक सल्लागार समिती नेमुन घरकुलाची चौकशी केली होती .या मध्ये 1206 घरकुलापैकी केवळ 302 घरकुले बांधलेली तिही निकृष्ट दर्जाची असल्याचे व 100 घरे पुर्ण पडलेले असल्याने ते पाडावे असे अहवालात नमुद करुन घरकुल बांधन्या करीता दिलेला पहिल्या टप्यातिल १०कोटी रुपयाचा निधी इतरञ खर्च करूण भ्रष्टाचार केल्याचे नमुद केले होते.हा अहवाल विभागीय आयुक्तांनी मा.उच्च न्यायालयात सादर करुन साक्षी पुरावे सादर केले त्या नुसार न्यायालयाने दोशीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते.जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने नळदुर्ग नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात आठ जणांवर संगणमताने भ्रष्टाचार करुन दहाकोटी चे शासनाचे आपहार केल्याची फिर्याद सन 2018मध्ये नळदुर्ग पोलीस ठाण्यात दिली होती यात नळदुर्ग नगरपालिकेचे तात्कालिन नगराध्यक्ष सध्या भारतीय जनता पार्टीत असलेले विद्यमान नगरसेवक उदय अंबादास जगदाळे,निर्मला गायकवाड, तात्कालिन उपनगराध्यक्ष भा.ज.पा. चे विद्यमान नगरसेवक नय्यर सज्जाद जाहगीरदार ,तात्कालिन मुख्याधिकारी दिलीप गणपतराव देशमुख,
अभियंता अब्दुल रहेमान खान ,कामाचे ठेके घेतलेली लातुर येथिल मिनार कंन्ट्रक्शन कंपनीचे मालक,संजय सुधीर राजहंस व इतर चे नावे होते .सदर फिर्याद दाखल होताच घोटाळ्यातिल आरोपीनी आधी तुळजापूर व उस्मानाबाद येथिल न्यायालयात अटक पुर्व जामीनासाठीअर्ज केला होता तो फेटाळन्यात आला त्या नंतर औरंगाबाद उच्च न्यायालयाने ही अर्ज फेटाळुन आरोपीवर गुन्हा नोंदवुन संपुर्ण रक्कम व्याजासह वसुलीचे आदेश दिले त्यास आरोपीनी सर्वोच्य न्यायालयात आपिल केले होते. त्याचा निकाल दि.५आँक्टोबर रोजी जाहीर केला आसुन औरंगाबाद उच्चन्यायालयाचे आदेश कायम ठेवुन सर्व आरोपींचे अटकपुर्व जामीनाचे अर्ज फेटाळुन लावले आहेत.व सर्वोच्य न्यायालयाने कडक ताशेरे ओढत हातर संगणमताने ठरवुन केलेली शासनाची फसवणुक आसुन अश्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी विरुध्द औरंगाबाद उच्चन्यायालयाने दिलेला निर्णय योग्य असल्याचे सांगुन जामिन फेटाळुन लावला आहे.सदर निकाल सर्वोच्च न्यायालयातिल न्यायमुर्ति नागेश्वरराव व न्यायमुर्ति रविंद्र भट्ट यांनी दिला.
नळदुर्ग घरकुल घोटाळ्यातिल सदर प्रकरण हे उस्मानाबाद आर्थिक गुन्हे शाखेकडे आसुन तुळजापुर तालुक्याच्या आमदारांचा सर्व आरोपीस वरदहस्त असल्याने अद्याप एकाही आरोपीस अटक झाली नसल्याचे बोलले जात आहे तर सर्व आरोपी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परीसरातच मोकाट फिरत असताना पोलीस माञ फरार घोषीत करीत असल्याने पोलीसांच्या कृतीकडे संशयाने पाहीले जात आहे. हे सर्व गंभीर प्रकरण असुन उस्मानाबाद येथे नुतन आलेल्या जिल्हा पोलीस अधिक्षक निवा जैन या कोणती भुमिका घेतात याकडेलक्षलागले आहे तर जिल्ह्यातील नागरीकातुन तिव्र संताप व्यक्त होत आहे.