एक महिन्याची मुदतवाढ द्या – जिल्हा परिषद सदस्य रूपालीताई पंदीलवार

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरातील शेतकऱ्यांची कृषी पंपाची वीज कपात करू नये शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात धान पिकाचे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे व धानाचे पीक अंतिम टप्प्यात असल्याने शेतकऱ्यांना धान पिक हातात येईपर्यंत वेळ लागतो करिता शासनाने शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी एक महिन्याची मुदत वाढ देण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सौ रुपालीताई पंदिलवार यांच्याकडून होत आहे


याबाबत आपण जिल्हाधिकारी साहेब गडचिरोली यांना निवेदन देणार असून धान पिक शेवटच्या टप्प्यात असताना वीज कापली तर शेतकरी धान पिक हातात येण्यापासून वंचित राहतील व भविष्यातही विज बिल भरू शकणार नाही करिता विज बिल कपातीची मोहीम थांबवण्यात यावी अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य रूपालीताई पंदीलवार यांनी दिली


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *