
पालघर : डहाणू तालुक्यातील ४३ तृतीयपंथांना सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल व डहाणू तालुका तहसीलदार अभिजीत देशमुख ,नायब तहसीलदार नरेंद्र माने ,भूषण पाटिल,इनामदार यांच्या हस्ते ओळखपत्र आणि प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.यामुळे शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहणार्या तृतीयपंथाना आत्ता विविध योजनांचा लाभ घेणे शक्य होणार आहेडहाणू आणि परीसरात जवळपास ५० पेक्षा अधिक तृतीयपंथ राहत असून महामार्गावरील चारोटी टोलनाका आणि दापचरी येथील सीमा सुरक्षा तपासणी नाका या ठिकाणी बहुतेक जण भीक मागून गुजराण करीत आहेत.त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा ओळखीचा,राहण्याचा पुरावा नसल्याने शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणे शक्य होत नव्हते.डहाणू येथील शिवसेना कार्यकर्त्या उज्वला ढोमसे यांनी या सर्व तृतीयपंथी महीलाना एकत्र करीत सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि तहसिलदार अभिजीत देशमुख यांच्या सहकार्याने आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव केली.यातील पहील्या टप्प्यात ४३ तृतीयपंथीयांना आशिमा मित्तल यांच्याहस्ते ओळखपत्र आणि प्रमाणपत्र यांचे वाटप करण्यात आले.

यामुळे आत्ता या तृतीयपंथीयांना संजय गांधी निराधार योजनेतून प्रती महीना १००० रूपयांचा लाभ घेणे शक्य होणार आहे.त्याचप्रमाणे तृतीयपंथींना आता आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, निवडणूक ओळख पत्रा सोबत शिधापत्रिका मिळून त्याद्वारे रास्त भाव धान्य दुकानांतून आवश्यक धान्य व शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार मिळणार असल्याने तृतीयपंथीयांच्या चेहऱ्यावरती हास्य फूलले.