गडचिरोली : अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला. दारुबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात बनावट विदेशी दारुनंतर आता हातभट्टीच्या दारुतही मोठ्या प्रमाणात भेसळ करण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत .राजाराम परिसरात तर गूळऐवजी आता साखरेपासुन दारु निर्मित सुरु झाली आहे.

ही दारु आरोग्यासाठी अधिक घातक असल्याचे सांगितले जात असून गूळ आणि यूरियापासुन अर्वैधपणे हातभट्टीची दारू काढण्याचे प्रणाम या भागात चालू आहे. दारू गाळणायांचे फावते.या विषारी दारुमुळे पिणार्‍यांची प्रकृती ढासळत जाऊन एक दिवस त्याला स्मशानाच्या याञेवर निघावे लागते.यातुन कित्येक जणांचे संसार उघडयावर आले आहेत तरीही याचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच आहे.आता त्यात साखरेच्या दारूची भर पडली आहे साखरेची दारू गूळापेक्षाही अधिक घातक असल्याचे बोलले जाते.दारूमुळे व्यसनाधीन लोकांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे वांरवार ही दारू पिल्याने यकृत खराब किंवा कमजोर होत आहे.या दारूला आणखी जास्त नशा येण्यासाठी एन्डोसल्फान या बंदी घालनण्यात आलेल्या विषारी किटकनाशकाचा उपयोग करण्यात येतो या किटकनाशकात बुडविलेली काडी दारु गाळताना त्यात बुडवून काढली जाते त्यामुळे दारूची नशा जास्त राहते.सध्या प्रशासनाकडून दारूसाठी वापरल्या जाणार्‍या काळ्या गूळाच्या विक्रीवर बंदी घातली आहे गूळाचा ठिकानी हलकी साखर वापरणे जास्त सोयीचे ठरत आहे तरी पोलीस विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

सुरेश मोतकुरवार
अहेरी /गडचिरोली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *