उस्मानाबाद : लातूर राज्यमहामार्गालागत असलेल्या नारंगावाडीपाटी येथे दि२१ गुरुवार रोजी दुपारी एका झाडाखाली प्लास्टिक पोते अंथरून एका झाडाखाली झोपलेला इसम काहीच हालचाल करत नसल्याचे नागरिकांना निदर्शनास आले, काही तासांनंतर तो मृत असल्याचे नागरिकांना समजले. त्यावर पोलिसांना कळविले तेंव्हा खाजगी चारचाकी वाहनाच्या साहाय्याने उमरगा हलविण्यात आले.

घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी सांगितले की असे प्रकार या पूर्वीही बरेच घडले असून,दारू मुळे अनेक संसार उघड्यावर येत आहेत, हा मयत व्यक्ती होळी गावचा रहिवासी आहे व बिगारी कामावर जाणार मजूर असल्याचे उपस्थित नागरिकांनी सांगितले. उल्लेखनीय बाब म्हणजे ज्या दारू दुकानात हा व्यक्ती दारू पिला त्याच दुकानाच्या शेजारी असलेल्या झाडाखाली विश्रांती घेन्याहेतु प्लास्टिक पिशव्या अंथरून झोपला होता,पण त्याला कुठे ठाऊक होते की ही विश्रांती कायमची विश्रांती ठरणार..! सरकारमान्य दारू दुकान जरी असला तरी आपल्या संसाराकडे,मुलाबाळांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायचे सोडून व्यसनाधीन होऊन सरकारमान्य किंवा अनधिकृतपणे विक्री होणारे हातभट्टी, शिंदी, दारू प्यायला जाणाऱ्या गोरगरीब मजुरांनी विचार करणे आवश्यक आहे.यावेळी या ठिकाणी पो. उपनिरीक्षक रमाकांत शिंदे व पोलीस कर्मचारी, ग्रामस्थ व वंचित बहुजन आघाडीचे नेते राम भाऊ गायकवाड आदी उपस्थित होते.

(सचिन बिद्री : उमरगा )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *