गडचिरोली : जिल्हातील मोठे उधोग कारखाने नसल्याने येथील मजुरांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाहि करण्यासाठी तेलंगाणा राज्यामध्ये धाव ध्यावे लागते माञ गडचिरोली जिल्हा हा जंगलाने नटलेला आहे.तेंदूपाने हंगामात येथील नागरिकांना आर्थिक पाठबळ मिळते. माञ हीच परिस्थिती राजाराम परिसरातील नागरिकांची आहे तेदूपत्ता संकलनाच्या कामाला 13 मेपासुन या भागात सुरुवात झाली

असुन यासाठी मजुरांमध्ये लगबग दिसुन येत आहे या भागात तेंदूपत्ता हंगाम हा फारच थोडया दिवस चालतो माञ तरीही या कमी कालावधीतील हंगामाला मजुरांकडून चांगला प्रतिसाद मिळतो यावर्षी राजाराम परीसरातील गावांमध्ये दुष्काळाची स्थिती आहे.खरिपानंतर रब्बी हंगामातही हातात केवळ निराशेचेच पीक पडल्यानंतर कुटूंबाच्या उदरनिर्वाहाचा प्र.निर्माण झाला.यावर्षी पेसा कायधांतर्गत तेंदूपत्ता संकलनाची जबाबदारी अनेक ग्रामसभांनी स्वीकारली तर काही ग्रामसभांनी वनविभागामार्फत तेंदूपत्ता संकलन करण्याचा पर्याय स्वीकारला आहे राजाराम परिसरातील काही गांवामध्ये पेसा कायदा लागू असुन आता तेंदूपत्ता हंगामाला सुरुवात झालेली आहे.