जालना  : दैठणा गावाचे मा.सरपंच शत्रुघ्न कणसे पाटील यांची सरपंच परिषदेच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. परिषदेचे राज्य अध्यक्ष जितेंद्र राजे भोसले व आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.

श्री शत्रुघ्न कणसे पाटील विविध योजनांच्या माध्यमातून गावाचा विकास साधला आहे.यासोबतच ते तालुक्यातील सरपंच यांना येणाऱ्या अडचणी बाबत तत्पर असतात यासोबतच तालुक्यात काम करत असताना तळागळापर्यंत सरपंच संघटनेचे विचार पोहचविण्याचे काम केल्यामुळे त्यांची निवड करण्यात आली असल्याचे मानले जात आहे तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याने व आदर्श सरपंच म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असल्याने सरपंच परिषदेचे राज्याध्यक्ष जितेंद्र राजे भोसले, यांच्यासुचनेवरून श्री कणसे यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
उस्मानाबाद येथील सरपंच परिषदेच्या एका कार्यक्रमात सदरील निवड करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार कैलास पाटील,सरपंच परिषदेचे राज्याध्यक्ष जितेंद्र राजे भोसले,कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर वायाळ,महिला प्रदेशाध्यक्ष श्री सौ जीनत सय्यद, स्थानिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष ,तसेच जी.परिषद सदस्य,सभापती,राज्य कार्यकारिणीचे सदस्य यांच्यासह सरपंच मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
श्री.शत्रुघ्न कणसे पाटील यांच्या निवडीचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *