शाळा बंद असल्याने पालकांची चिंता वाढली
गडचिरोली : गेल्या दिड वर्ष पासून संपूर्ण भारतात कोरोणाचे संकट चालू होते या कोरोणा संकटाला रोखण्यासाठी शासनाने लाकडावून केले व शाळा बंद करून ऑनलाईन शिक्षण घेण्याचे सांगितले परंतु गडचिरोली सारख्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्या जवळ महागडे मोबाईल नसल्याने ऑनलाईन शिक्षण घेऊ शकणार नाहीत.
कोरोणाच्या संकटात सापडलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना दिड वर्ष पासून हाताला कोणताही रोजगार नाही तर मूलाना महागडे मोबाईल कूठून घेऊन देणार हा मोठा प्रश्न पालकांना पडला आहे शाळा बंद होऊन दिड वर्ष होऊन गेले मूल घरी राहून मुलांमध्ये चिडचिड पणा खोडरपणा वाढल्या आहे त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे अशीच यावर्षी शाळा बंद राहिली तर मूलाना शाळेत जाण्याची ईच्छा सुद्धा होणार नाही शाळा बंद राहिली तर विद्यार्थीचा विकास कसा होईल या करीता शासनाने काहीतरी निर्बंध ठेवून शाळा सुरू करावी अशी मागणी पालकांकडून जोर धरू लागली आहे.