धरणाच्या खालच्या बाजूस राहणार्‍या नागरीकांना सुरक्षित जागी हलवण्यास सुरवात

पालघर – जवळील माहीम-केळवे लघूपाटबंधारे योजनेतील झांजरोळी धरणाच्या भिंतीला भगदाड पडून पाण्याची गळती सुरू झाल्याने खालच्या बाजूस रहाणार्‍या नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.धरणाखालील नागरीकांना जिल्हा प्रशासनातर्फे सुरक्षितस्थळी हलविण्यास सुरवात करण्यात आली असून बंधार्‍यातील पाणीसाठा हळूहळू कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आखण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला दिल्या असून युद्ध पातळीवर दुरुस्तीच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे.


झांजरोळी धरणाची एकूण पाणीसाठा क्षमता ३.१३५ दलघमी सध्या धरणात २.६०० दलघमी इतका साठा अस्तीत्वात आहे. असून या धरणातून केळवे व सफाळे परीसरातील गावांना पिण्याचा पाणीपुरवठा करण्यात येत असून खालच्या बाजूकडील गावांना देखील शेतीसाठी देखील पाणी सोडले जाते.झांजरोळी धरणाच्या कालव्याच्या मुख्य विमोचकाच्या भिंतीच्या शीर्षक बाजूस गळती सुरू असल्याची बाब स्थानिकांनी पाटबंधारे विभागास लक्षात आणून दिल्यानंतर याबाबतीत नाशिक येथील धरण सुरक्षा विभागास कळविण्यात आले

होती.यानंतर धरण सुरक्षा विभागाने धरणाच्या गळती होत असलेल्या भिंतीची पाहणी करून पाणी हळू हळू कमी करण्याच्या सूचना पालघर पाटबंधारे विभागाला देण्यात देण्यात आल्या असून भिंतीला पडलेल्या भगदाडाचा आकार सातत्याने वाढून गळती देखील वाढत असून उतार ढासळू लागल्याने धरणाला धोका निर्माण झाला आहे यामुळे पालघर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून धरणाच्या खालच्या बाजूस असलेले पठारपाडा,पाटीलपाडा,झांजरोळी,केळवेरोड,मायखोप यागावपाड्यातील नागरीकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यास सुरवात करण्यात आली असून एनडीआरएफच्या तुकडीला देखील पाचारण करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *