पालघर : तालुक्यातील माहीम - केळवा धरणामधून मधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरु झाली आहे. हे धरण झांजरोली गावाच्या वरील बाजूस असल्याने धरणाच्या खालील गावांना जिल्हा प्रशासनाकडून धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

माहीम-केळवे धरणातील पाण्याची गळती ही गंभीर बाब असून, यामुळे आपत्कालीन परिस्थिती निमार्ण झाली आहे. तर लगतच्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होण्याचा सल्ला जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

या घटनेची माहिती मिळताच जिल्हापरिषद अध्यक्ष वैदेही वाढाण , जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी भेट दिली