पालघर : खासदार राजेंद्र गावित यांनी पालघर जिल्ह्यातील सर्व विभागातील अभियंत्यांची बैठक बोलून ठेकेदार शाहीला बळी न पडता शासनाच्या निकषाप्रमाणे व अंदाजपत्रकाप्रमाणे उत्तम दर्जाचे काम करा असा सल्ला दिला कामाचा दर्जा चांगला असला पाहिजे ह्याच अपेक्षेने काम करा तसेच पालघर जिल्ह्यातील जवळपास २५० गाव/पाडे आजही रस्ते विकासापासून न जोडलेले आहेत त्यांचे अंदाजपत्रके लवकरात लवकर तयार करा तसेच डोंगराळ भागांमध्ये फुट ओवर ब्रिज बांधण्यासाठी खासदार निधी अंतर्गत आपण प्रयत्न करू असे ते म्हणाले.

मागील दोन वर्षापासून दिलेली कामे, पूर्ण झालेली कामे, अपूर्ण कामे, आजपर्यंत सुरू न झालेली कामे, यांचा आढावा घेतला ऑर्डर देऊन सुद्धा कामे प्रलंबित का आहेत ती लवकरात लवकर पूर्ण करावीत असे निर्देश सर्व विभागातील अभियंत्यांना देण्यात आले. महाराष्ट्र जल जीवन प्राधिकरण अंतर्गत गारगाव खानिवडे झांझरोली उंबरगाव नंदाळे ६९ गावे पाणी पुरवठा योजना ह्यांच्या गाव पातळीवर बैठका घेऊन पाण्याचा प्रश्न सोडवावा असे निर्देश दिले.

मुंबई प्राधिकरणांतर्गत वसई विरार मीरा भाईंदर पाणी पुरवठा योजना ह्या मध्ये येणाऱ्या हायवे लगतच्या ७४ गावांमध्ये नळजोडणी देऊन पाण्याचा प्रश्न सोडवावा ह्याकरिता ट्यापिंग, प्रेशर मॅनेजमेंट कसे असेल याचे नियोजन करावे असेही निर्देश महाराष्ट्र जल जीवन व पाणी पुरवठा विभाग, पालघर ह्यांना देण्यात आले. सदर बैठकीस खासदार राजेंद्र गावित, शंखपाळे कार्यकारी अभियंता सा. बां. व जि. प. निवडुंगे, कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग, पालघर, भदाणे, प्र. म. ग्रा. स. चौधरी, शेंडे, दास, पाटील, ठाकरे, जाधव, किणी, उप अभियंता व कनिष्ठ अभियंता बैठकीस उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *