पालघर : (डहाणू) मनोज इंगळे यांचा मृतदेह विरार रेल्वेस्थानका जवळ सापडला असून त्यांचा अपघात झाला की आत्महत्या ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. चिंचणी ग्रामपंचायतीचे सरपंच कल्पेश धोडी यांना मागील महिन्यात एका विकासकाकडून लाच घेताना पालघर लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले होते. या प्रकरणात ग्रामविकास अधिकारी मनोज इंगळे यांची देखील पोलिसांकडून चौकशी सुरू होती. या आधी ग्रामविकास अधिकारी मनोज इंगळे आशागड आणि नरपड ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यभार पहात होते तर चिंचणी व्यतिरिक्त चिखले ग्रामपंचायतीचा अतिरीक्त पदभार पाहत होते. काही दिवसा पूर्वी चिंचणी ग्रामपंचायत मध्ये बिल काढून त्याचा निधी परस्पर काढण्याचा आरोप झाला होता. याबाबत शुक्रवारी झालेल्या पालघर जिल्हा परिषद येथे याबाबतचा विषय उघडण्यात आला होता व या तणावातून त्यांनी आत्महत्या तर केली नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *