(प्रविण बाबरे)
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा) अंतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान अंतर्गत गरीब व गरजू लाभार्थी शेतकरी बांधवांना शेतीमाल विक्रीसाठी साहित्याचे वाटप करून आज पालघर येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे भाजीपाला विक्रिकेन्द्र युनिट साहित्य वाटप पालघर विधानसभेचे आमदार श्री.श्रीनिवास वनगा यांच्या हस्ते करण्यात आले,
पालघर तालुका कृषी व विभागीय कार्यालय च्या वतीने सदर योजनेच्या माध्यमातून पालघर तालुक्यातील गरीब व गरजू लाभार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले,
यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक श्री.तरकसे, माजी कृषी सभापती श्री.सुशील चुरी,उपविभागीय कृषी अधिकारी श्री.नेरकर, तालुका कृषी अधिकारी श्री. वैती,आत्मा चे श्री.वाळके,युवासेना पदाधिकारी श्री.जश्विन घरत,श्री.रॉकी तांडेल या सह अधिकारी व कर्मचारी व लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.
यावेळी विकेल ते पिकेल या योजने मुळे सर्व सामान्य शेतकरी बांधवांना आत्मनिर्भर होण्यासाठी मोठी मदद मिळेल असा आशावाद शिवसेनेचे पालघर चे आमदार श्री.श्रीनिवास वनगा यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *