एटापल्ली कसनसूर मार्गावर चक्का जाम करणारं -संदीप कोरेत
रस्त्याचा नूतनीकरणासाठी दिला १५ दिवसाचा अल्टीमेंट
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील एटापल्ली ते कसानसुर मार्गाची दुरवस्था झालेली आहे व त्याचे नूतनीकरण लवकरात लवकर करण्यात यावे या साठी अनेकांनी निवेदनाद्वारे आपापले मत बांधकाम विभाग यांच्या कडे प्रगट केले आहे. तरी सुध्दा बांधकाम विभाग कुंभकर्णी झोपेत असल्यामुळे या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करीत आहेत त्यामुळे निद्रिस्त बांधकाम विभागला झोपेतून जागे करण्यासाठी एटापल्ली कसनसुर मार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा आदिवासी आघाडी महाराष्ट्र राज्य चे प्रदेश सदस्य संदीप कोरेत यांनी निवेदनाव्दारे तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी गडचिरोली यांना देण्यात आले.

एटापल्ली ते जरावांडी या ४६ किलोमिटर असलेल्या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळून दोन वर्षा पेक्षा अधिक काळ लोटून गेला आहे या दोन वर्षात फक्त कासनसुर ते जरावंडी या १६ किलोमिटर रस्त्याच्या नूतनीकरण झाले आहे पण एटापल्ली ते कसनसुर या ३० किलोमिटर नंतर असलेल्या रस्त्याच्या नूतनीकरण करण्याच्या कामासाठी अजुन मुहुर्त सापडत नाही का किंवा हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाला करायचं नाही हे समजायला मार्ग नाही या महामार्गावर. तोडसा, आलेंगा, अलेंगा टोला, करमपल्ली, मवेली, देवदा, पूनुर, हालेवरा, व या गावांच्या जवळपास ४० ते ५० गाव जोडली आहे या रस्त्यावर अनेकदा कधी छोटे तर कधी मोठे अपघात झाले आहे अनेकांना आपला जीव सुद्धा गमवा लागला सध्या प्रवास करणारे लोकं आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करतं आहेत. प्रवास करणाऱ्यांना लोकांना मणक्याचे व कमरेचे त्रास होण्याचे प्रमाण वाढले आहेतरी या गंभीर विषयाकडे संबधित विभाग जाणुन बुजुन दुर्लक्ष करीत आहेत येत्या १५ दिवसांत रस्त्याच्या नूतनीकरण कामाला सुरुवात न केल्यास ८ मार्च रोजी एटापल्ली कासनसूर महामा र्गावर पीडित लोकांना घेऊन भाजपा तर्फे चक्का जाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजप आदिवासी आघाडी महाराष्ट्र राज्य प्रदेश सदस्य संदीप कोरेत या वेळी तालुका अध्यक्ष भाजपा विजय नल्लावार उपसभापती पंचायत समिती एटापल्ली, जनार्दन नल्लावार स्वीकृत नगरसेवक नगर पंचायत एटापल्ली, दीपक सोनटक्के, खेडचंड वेरागडे आणि भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
एन टिव्ही न्युज मराठी
अहेरी गडचिरोली