उस्मानाबाद : गुटख्यातून कोट्यवधींची उलाढाल राज्यात गुटखा बंदी झाल्यापासून छुप्या मार्गाने गुटखा आणून विक्री केला जातो. गुटख्याला ग्राहकांची मागणी अधिक असल्याने टपरीचालकापर्यंत गुटखा पोहोचवला जातो. टपरीचालक तीन ते चारपट दराने गुटखा विक्री करून कोट्यवधींची कमाई करतात. तुळजापूर तालुक्यात गुटखा कुठून येतो, गुटखा पुरवणारा डीलर कोण आहे आणि गुटखा छोट्या मोठ्या दुकानदारापर्यंत कसा पोहोचवला जातो. याविषयी इत्यंभूत माहिती पोलिसांना असते. मात्र, गुटखा माफियांसोबत असलेल्या ‘‘अर्थपूर्ण’’ संबंधामुळे गुटखा विक्रीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अन्न व औषधी प्रशासनाला कारवाईचे अधिकार गुटखा विक्रेत्यांवर कारवाईचे अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना कारवाईचे अधिकार आहेत. मात्र, या विभागाकडून भरीव अशी कारवाई आतापर्यंत झालेली दिसत नाही. पोलीस अधिकारी, कर्मचारी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना सोबत घेऊन कारवाई करतात. अन्न सुरक्षा अधिकारी याची फिर्याद घेऊन गुन्हा नोंदवितात.गुटखा पकडण्याचा आता पोलिसांनाही अधिकारराज्यात गुटखाबंदी आहे; तरीपण कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून गुटखा विक्रीसाठी येत असल्याचे मागील वर्षभरात विविध ठिकाणी केलेल्या कारवाईवरून उजेडात आले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडे अन्न निरीक्षक आहेत. कारवाईसाठी मनुष्यबळ कमी पडत आहे. यामुळे शासनाने गुटख्याविरोधात कारवाई करण्यासाठी पोलीस विभागाला अधिकार दिले आहेत. अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस विभाग गुटख्याविरोधात कारवाई करण्याऐवजी त्यांच्याशी संबंध ठेवून गुटखा तस्करी पोलिसांच्या आशीर्वादाने मात्र तालुक्यात खुलेआम सुरू आहेअशा अधिकाऱ्यावर आता काय कारवाई होणार याकडे लक्ष..!
प्रतिनिधी (आयुब शेख)