वाचन संस्कृती जागरण पंधरवाडा अंतर्गत “पुस्तक पालखी” व विद्यार्थी-शिक्षकांना मार्गदर्शन संपन्न
उस्मानाबाद : – सचिन बिद्री,उमरगा
दि.१६ डिसेंबर, २०१८ रोजी प्रा.शामराव रघुनाथ चव्हाण स्मृती वाचनालयाची मुळज येथे स्थापना झाली. त्यानंतर या वाचनालयाच्या उमरगा-लोहारा तालुक्यातील ग्रामीण भागात जवळपास १० शाखा सुरु करण्यात आल्या. समाजात वाचन संस्कृती रुजवून, सजग नागरीक तसेच सर्वसामान्य कुटुंबातून सक्षम नेतृत्व उभे करण्यासाठी वाचनालयाच्या वतीने अनेक उपक्रम राबवण्यात येताना दिसून येत आहे.याच उपक्रमांचा एक भाग म्हणून दि. १५ जानेवारी २०२२ ते ३१ जानेवारी दरम्यान “वाचन संस्कृती जागरण पंधरवडा” साजरा केला जात असल्याचे Adv शीतल चव्हाण यांनी Ntv न्युज मराठीशी बोलताना सांगितले. पंधरवड्याच्या पहिल्याच दिवशी उमरगा शहरातून महात्मा बसवेश्वर मंदिर-महादेव मंदिर-छ. शिवाजी चौक-इंदिरा चौक-आण्णाभाऊ साठे चौक-डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा-छ. शिवाजी महाविद्यालय-आदर्श महाविद्यालय यामार्गे “पुस्तक पालखी” फिरवण्यात आली.पहिल्यांदाच उमर्गेकरांना अश्या आगळ्या वेगळ्या पालखीचे दर्शन झाले ज्यामध्ये ज्ञान वृद्धी करणाऱ्या निरनिराळ्या पुस्तकांचे दर्शन घडले…! शहरातील प्रत्येक चौकात, मार्गात या ‘पुस्तक पालखीला” नागरिकांतून उत्सुर्फ सहभाग तथा सहकार्य लाभला. शहरातील नागरीक, सामजिक, राजकीय व उद्योग क्षेत्रातील व्यक्तीनी या पुस्तक पालखीत जवळपास १००० पुस्तकांचे दान केले.जी ही सर्व पुस्तके वाचनालयाच्या सर्व शाखांना विभागून दिली जाणार आहेत.यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील वाचकांना चांगलाच फायदा होणार यात शंका नाही.

दुपारच्या सत्रात उमरगा शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांना वाचनाचे महत्व पटवून देण्यात आले.तर डॉ.बालाजी इंगळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही लाभले.
पंधरवड्यातील पुढील दुवसांत वाचनालयाच्या प्रत्येक शाखेमार्फत ग्रंथदिंडी काढली जाणार असल्याचे Adv शीतल चव्हाण यांनी माहिती दिली. तसेच त्या-त्या गावातील विद्यार्थी व शिक्षक यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.वाचन संस्कृती रुजवण्यासाठीचे हे आगळे-वेगळे उपक्रम समाजात जागृती निर्माण करण्यासाठी सदर उपक्रम खूप महत्वाचे ठरनार हे नक्की..!
वाचाल तर वाचाल…!

आजकालच्या डिजिटल जीवन पद्धती मूळे अन् वाढत्या पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे आपल्याकडे वाचन संस्कृती थोडी मागे पडू
लागली आहे हे प्रत्येकाला मान्य करावेच लागणार आहे, कारण घरोघरी पाहिलं तर लहान मुले काय पण मोठी माणसे सुध्दा फार कमी वाचन
करताना दिसतील. काहीना तर धावपळीच्या जीवनात वाचन
करणे म्हणजे अगदी वेळखाऊ झाले आहे असे वाटते.त्यामुळे बऱ्याच लोकांच्या मोबाइल मध्ये वेगवेगळे अॅप आले आहेत,ज्यामध्ये शॉर्ट news, video, headlines, foral quick article रिल्स असे बघायला हमखास मिळतील. तसेच येता जाता प्रवासामध्ये किंवा घरातले काम करत कॉमेडी वव्हिडिओ, रिल्स ऐकताना/पाहताना दिसतील, तर बरेच अॅप असेही आहेत ज्या मध्ये पुस्तके
audio रुपात म्हणजे ऐकायला मिळतात. प्रत्यक्ष हातात एखादे पुस्तक/ग्रंथ/ घेऊन वाचन करताना दिसून येईल.पण जेव्हा आपण स्वतः एखादे पुस्तक प्रत्यक्ष वाचू तेव्हा त्यांचे ‘शब्द’आपल्या मनात, डोक्यात छापली जातात.मन समरूप होते. एकाग्रता
वाढते.”वाचन क्रियाच अशी आहे की ज्यामध्ये आपल्याला शब्दांची ओळख होत असते.तो शब्द कसा, कुठे वापरायचा?याचे सुद्धा आपल्याला ज्ञान वाचनाने होते. शब्द भंडार
वाढवण्यात वाचनाचा तर सर्वात जास्त हातभार आहे.” आणि Adv शीतल चव्हाण हे गेल्या 3 वर्षांपासून उमरगा लोहारा तालुक्यात वाचन सांस्कृतिला पोषक वातावरण निर्माण करताना दिसून येतात तर प्रत्येक घरात निदान एखादा तरी वाचक निर्माण व्हावा या उदात्त हेतून जणू वाचनाची चळवळ च निर्माण केली आहे. Adv शीतल चव्हाण सोशल फाऊंडेशन च्या माध्यमातून वाचकांना प्रेरणा नक्कीच भेटत असून दिवसेंदिवस पुस्तकप्रेमींच्या संख्येत वृद्धी होत आहे.