—शाळेची डिजिटल शैक्षणिक वाटचाल, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत शिक्षकाचे भरीव योगदान.
पालघर : जिल्ह्यातील जव्हार तालुक्याच्या सरहद्दीजवळ डहाणू तालुक्यात असलेले गडचिंचले गाव मागे दिड वर्षापूर्वी घडलेल्या साधूंच्या हत्याकांडामुळे महाराष्ट्र भर गाजले होते. गडचिंचले हे आदिवासी गाव असुन येथील समाजाकडून १६ एप्रिल २०२० रोजी जनतेने अफवेला बळी पडून साधूंचा निष्पाप बळी घेतला होता.ह्या घटनेला आता दिड वर्ष लोटले आहेत.आदिवासी समाजातील अशिक्षित पणा ह्या गोष्टीला कारणीभूत ठरला होता.हे चिञ त्यावेळी रंगविले गेले होते.

खरं पाहता डहाणू गडचिंचले गाव कुठे आहे?तेथील आदिवासी समाज कसा आहे? शाळेची शैक्षणिक वाटचाल कशी आहे? ह्या प्रश्नांविषयी मनात नेहमी कुतूहल होते.त्या गावाला जाण्याचा योग जव्हारच्या काही पञकारांना आला.त्यांनी तेथील जि.प.गडचिंचले शाळेला भेट दिली असता शाळेची सजावट ,शैक्षणिक प्रगती,रंगरंगोटी, विद्यार्थ्यांना बँच, सोलर पँनल,शाळेच्या आवारात स्वच्छता पाहावयास मिळाली.आदिवासी ग्रामीण भागातील शाळा परंतु शहरी शाळांना हि लाजविल अशी डिजिटल शाळा पाहुन पञकारांना हि आश्चर्य वाटले.यावेळी गडचिंचले शाळेच्या डिजिटल शैक्षणिक वाटचाली विषयी शिक्षक विलास धर्मा पिलेना यांच्याशी आमचे Ntvचे जव्हार प्रतिनिधींनी खास संवाद साधला.

डहाणू तालुक्यातील ग्रामीण आदिवासी भागात गडचिंचले गावात जिल्हा परिषदेकडून सन-१९५० साली हि शाळा बांधली आहे. हि शाळा इयत्ता १ ली ते ५ वी पर्यत आहे. गडचिंचले शाळा सायवन केंद्रात येते.शाळेत सद्या ५२ विद्यार्थ्यांची पटसंख्या असुन हि १ शिक्षकी शाळा आहे. इ.१ लीत २२, इ.२ रीत १७, इ.३ रीत ६ ,इ.४ थीत १ तर इ. ५ वीत ६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अशा ह्या शाळेत मुले ३३ व मुली १९ अशी ५२ पटसंख्या विद्यार्थ्यांची आहे. सद्या लाँकडाऊन काळात कोरोनात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या गावपाड्यांवर जाऊन विद्यार्थ्यांना एकत्र बोलावुन आँफलाईन पध्दतीने त्यांना शिकविले जात आहे. त्यावेळी विद्यार्थी हि मोठ्या आवडीने येतात. गडचिंचले गावाची लोकसंख्या साधारणतः १७०० असुन यात एकूण ९ पाडे येतात. त्यापैकी शाळा हि ६ गावपाड्यांवर अवलंबून आहे. त्या शाळेत हेद पाडा, चौकी पाडा, बोरकूड पाडा, खडकी पाडा, शेत पाडा, पाटील पाडा ह्या आदिवासी पाड्यांतील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.ह्या पाड्यांवर वारली व कोकणा समाजाची वस्ती प्रामुख्याने आढळते
डहाणू जि.प. गडचिंचले शाळेची डिजिटल वाटचाल
गडचिंचले शाळेत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य, पाण्याची सुविधा ,सोलर पँनल, लाईट सोलर पँनल, पंखे, किचन शेड ह्या शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सुविधा पाहावयास मिळाल्या.शैक्षणिक साहित्यात गणित पेटी, इंग्रजी पेटी, मराठी वाचन कार्ड, तक्तेंचा वापर,संगणक व प्रोजेक्टर चा वापर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केला जातो.


दिवशी ग्रामपंचायतीने गडचिंचले शाळेला पुरविलेल्या सुविधा
शाळेची लादी व सौर पँनल ग्रामपंचायतीने खर्च करुन बसवले आहेत तर विद्यार्थ्यांसाठी बँच जिल्हा परिषदेने पुरविलेले आहेत.शाळेतील मुलांमुलींच्या स्वच्छता गृहासाठी ग्रामपंचायतीने मंजुरी दिली आहे.
शाळेच्या शिक्षकाला शैक्षणिक कामगिरीत शिक्षण कमिटी व केंद्र प्रमुखांचे मार्गदर्शन
शाळेच्या शैक्षणिक वाटचालीत गावातील शालेय शिक्षण कमिटी व केंद्र प्रमुख यशवंत काशिनाथ गावित यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभल्याने शाळेच्या प्रगतीला चालना मिळते आहे. शाळेची रंगरंगोटी,सजावट,डिजिटल साहित्य खरेदी,पंखे,सुविचार फलक,फोटो,भिंती चित्रे यासाठी शिक्षकाने वैयक्तिक ३० हजार खर्च केलेला आहे.


ग्रामीण भागातुन आलेल्या शिक्षकाचे भरीव योगदान
गडचिंचले शाळेवर सद्या कार्यरत असलेले शिक्षक विलास धर्मा पिलेना याचे जन्म ठिकाण जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम गाव असलेले पिंपळशेत खरोंडा आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील समस्यांची जाण असल्याने त्यांनी खरोंडा येथे सन-२००० ते २०१४ या कालावधीत वस्तीशाळा शिक्षक म्हणून काम केले होते.त्यांनतंर सन-२०१५ साली ते परमनंट होऊन हुंबरण आदिवासी गावाच्या शाळेवर सन-२०१९ पर्यंत सलग ५ वर्षे काम केले.त्यानंतर तालुका बदलीद्वारे त्यांना डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषद गडचिंचले शाळेचा पदभार ७ मे २०१९ रोजी सोपविण्यात आला. त्यावेळी तेथील विद्यार्थी पटसंख्या अवघी १२ होती. माञ शैक्षणिक प्रगतीने आता २ वर्षात विद्यार्थी पटसंख्या ५२ झाली आहे. ज्या शाळेत ३० विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे.तेथे १ शिक्षक द्यावा लागतो हा शासनाचा नियम आहे.३० पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या शाळेंवर २ शिक्षक दिले जातात.हा शासनाचा नियम आहे.परंतु गडचिंचले शाळेची विद्यार्थी पटसंख्या ५२ असुन हि शाळा १ शिक्षकी आहे. हे शिक्षण विभागाविषयी दुर्दैव आहे.

ग्रामीण भागात विद्यार्थ्यांअभावी बहुतेक काही शाळा बंद होताना पाहावयास मिळतात.माञ शिक्षकाच्या प्रयत्नांनी विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत नक्कीच आमुलाग्र बदल होऊ शकतो.यात आजही शंका नाही.
“गडचिंचले शाळेसमोर सपाटीकरण व्हावे.याशिवाय विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज स्वछतागृह व शाळेला सरंक्षक भिंत व्हावी.हि शालेय शिक्षण कमिटीची मागणी आहे”.—श्री.विलास धर्मा पिलेना(शिक्षक),जि.प.गडचिंचले,ता.डहाणू,जि.पालघर.
जव्हार प्रतिनिधी
भरत गवारी (पालघर)
मोबा.नं*8408805860.